युतीचे सरकार न येण्यामागे भाजप-शिवसेनेचे एकमेकांकडे बोट

युतीचे सरकार न येण्यामागे भाजप-शिवसेनेचे एकमेकांकडे बोट
युतीचे सरकार न येण्यामागे भाजप-शिवसेनेचे एकमेकांकडे बोट

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या पंधरा दिवसांनंतर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शुक्रवारी (ता.८) आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असून, त्यामुळे राज्यात नवे सरकार येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकणार आहेत. 

राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी युतीचे सरकार न येण्याचे खापर शिवसेनेवर फोडले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप केला, भाजपचे ते वक्तव्य खूप क्लेशदायक होते, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. दोन्ही पक्षात पद आणि सत्तेचे समसमान वाटप असे ठरले होते. शहांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता, असा दावाही त्यांनी केला. 

श्री.फडणवीस यांनी राज्यात महायुतीचे सरकार न येण्याचे खापर शिवसेनेवर फोडले. निकालादिवशी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपल्यापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते. तेव्हाच आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. तरीही भाजपने सेनेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या फोनलाही उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही. भाजपशी चर्चेचे दरवाजे बंद करत सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मात्र चर्चा सुरू ठेवली होती, असा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी केला. तसेच शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपने कोणताही शब्द दिला नव्हता, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीला आम्ही युतीने सामोरे गेलो होतो, त्यामुळे राज्यात युतीचेच सरकार स्थापन व्हावे, अशी आमची भूमिका होती, असेही त्यांनी म्हटले आहे. जे गैरसमज झाले होते ते चर्चेतून सुटले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप  अत्यंत क्लेशदायक ः उद्धव ठाकरे  राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे ते वक्तव्य अत्यंत क्लेशदायक होते. वेळ मारून नेण्यासाठी मी खोटं बोलणार नाही. लोकसभेपूर्वी भाजप-शिवसेनेत झालेल्या बैठकीचे सर्व तपशील त्यांनी सर्वांपुढे मांडले. दोन्ही पक्षात पद आणि सत्तेचे समसमान वाटप असे ठरले होते. शहांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तेचे वाटप अशी बोलणी झाली होती. पद या शब्दात मुख्यमंत्रीपद हे आलेच. गोड बोलून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com