दोन दिवसांत युतीचे जागावाटप : उध्दव ठाकरे

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासोबतच चिंतामुक्त करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. - उध्दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

मुंबई : मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आहे की एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री मी राज्याच्या तख्तावर बसवेन. त्यासाठी जे करावे लागेल ते मी करेन, असे सांगतानाच येत्या एक ते दोन दिवसांत युतीचे जागावाटप होईल पण, जागावाटप झाल्यानंतर मी बंडखोरी सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी (ता. २८) शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या वेळी श्री. ठाकरे यांनी शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख आणि २८८ मतदारसंघातील इच्छुकांची बैठक बोलवली होती.

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की या वेळी कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे. प्रत्येक मतदारसंघात मला शिवसेना हवी आहे. २८८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद आपण वाढवली आहे. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आहे, की एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री मी राज्याच्या तख्तावर बसवेन. त्यासाठी जे करावे लागेल ते मी करेन, ही माझी शपथ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की लवकरच जागावाटप होईल. पण, जागावाटप झाल्यानंतर मी बंडखोरी सहन करणार नाही. त्यासोबतच, काहीही झाले तरी गद्दारी करायची नाही, अशी शपथ देखील त्यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून घेतली. शिवसैनिक सोबत असताना मला कोणाची भीती नाही. लोकांसाठी लढतात त्यांना सत्ता मिळते. माझे आणि अमित शहांचे बोलणे सुरू आहे, मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा होत आहे. आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही, प्रत्येक मतदारसंघात मला शिवसेना पाहिजे. आज-उद्या जागावाटप होईलच, पण एखादी जागा अशी असता कामा नये जिथे आपली तयारी नाही, असेही श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्याविषयी शुक्रवारपासून सुरू असलेल्या चर्चेवर देखील उद्धव ठाकरे यांनी या वेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की शरद पवार यांच्या कौटुंबिक भांडणात मला रस नाही. त्यामुळे अजिबात त्याचा आनंद झालेला नाही. आपण संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली आहे. पण जो कर्मानेच मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आम्ही कुणाशीही सूडाने वागत नाही. जे शिवसेनेशी वाईट वागले, त्यांचे मी कधीच वाईट चिंतित नाही. पण, त्याचे फळ त्यांना मिळते’, असा टोलाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. काही लोकांनी शिवसेना प्रमुखांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते. तेव्हा शिवसेना प्रमुख एक दिवस स्वत:च कोर्टात हजर झाले आणि माझा काय गुन्हा होता सांगा, असा जाब विचारला. त्या वेळी कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com