बोंड अळीचे अनुदान अन्‌ विम्याचा परतावा रखडला

बोंड अळीचे अनुदान अन्‌ विम्याचा परतावा रखडला
बोंड अळीचे अनुदान अन्‌ विम्याचा परतावा रखडला

नेकनूर, जि. बीड : यंदा दुष्काळ पडला असताना गतवर्षीच्या बोंड अळीचे अजून अनुदान मिळाले नाही. शिवाय भरलेल्या विम्याचा परतावाही आमच्या पदरी पडला नसल्याची व्यथा नेकनूर येथील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ६) जिल्हा प्रशासन दरबारी मांडली आहे.

नेकनूर येथील शेतकऱ्यांना बोंड अळी अनुदान व पीकविमा अनुदान वाटप झालेले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा व स्टेट बॅंक शाखेने अजूनही बोंड अळी व विमा परताव्याचे शेतकऱ्यांना वाटप केले नाही. कोणतेही अनुदान हे वेळेत वाटप होत नाही. एकतर दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आहे आणि त्यातही शासनाकडून येणारी तुटपुंजी मदत वेळेवर मिळत नाही.

मागील पाच महिन्यांपासून शेतकरी तलाठी कार्यालय, बॅंक व तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत; परंतु आजपर्यंत अनुदान वाटप झाले नाही. संबंधित अधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. वरिष्ठांकडे तक्रार केल्याशिवाय कोणत्याही अनुदानाचे वाटप होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वंचित व त्रस्त शेतकऱ्यांनी निवासी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com