परभणी ः ग्रामविकासाच्या विविध योजना साकारताना शासन ग्राम पातळीवरील शेवटच्या घटकांचा विचार प्राधान्याने करते. योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. बोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय खऱ्या अर्थाने लोकसहभागातील विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
बोरी (ता. जिंतूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण तसेच विविध योजनांच्या भूमिपूजन कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ३०) ते बोलत होते. माजी आमदार विजय भांबळे यांच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, माजी सभापती अशोकराव चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ सभापती अजय चौधरी, सरपंच निर्मला चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
टाकसाळे म्हणाले, की ग्रामपंचायती या विकासाची केंद्र झाली पाहिजेत. जागेच्या सात बारापासून ते कृषी, महसूल व बँकांची शासन निगडित असणारी कामे ग्रामपंचायत कार्यालयातच का होवू नयेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.