ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?

यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर निर्मितीवर भर दिल्याने तिथे साखरेचे उत्पादन वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या देशात सुमारे ५५ टक्के अधिक साखर उत्पादित होत आहे.
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?

कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर निर्मितीवर भर दिल्याने तिथे साखरेचे उत्पादन वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या देशात सुमारे ५५ टक्के अधिक साखर उत्पादित होत आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा करू शकते, असा अंदाज साखर तज्ञांचा आहे. ब्राझील यंदा साखर उत्पादन वाढवणार ही शक्यता काही महिन्यांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. आता ती खरी ठरत आहे. मार्चपासून या देशात गाळप हंगाम सुरू झाला आहे. गेल्या हंगामात ब्राझीलमधील बहुतांशी कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला होता. पण इथेनॉलला समाधानकारक भाव न मिळाल्याने तेथील कारखान्यांनी यंदा साखर उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. तिथे साखरेचे उत्पादन वेगात सुरू झाले आहे. उत्पादित झालेली साखर जागतिक बाजारपेठेत येण्याची शक्यता वाढली आहे. ही साखर बाजारात आल्यास भारतीय साखरेची मागणी घटू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेचा दबदबा असल्याने ही बाब भारतासाठी चिंताजनक ठरत आहे. ब्राझीलच्या दक्षिण क्षेत्राने मे महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत २.५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले. ‘कोरोना’मुळे जगभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये इथेनॉलच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांनी घट झाली. ब्राझीलमध्ये इथेनॉलची तोट्यात विक्री केली जात आहे. हे नुकसान साखर उत्पादनातून भरून काढण्याचे त्यांचे नियोजन आहे.

भारताला निर्यातीचा वेग वाढवावा लागणार सुरुवातीच्या काळात भारतामध्ये मे महिन्यापर्यंत सर्व प्रकारच्या वस्तूंचा निर्यातीला फटका बसला त्यात साखरेचा ही अपवाद नव्हता. परंतु, मे महिन्यानंतर मात्र स्थिती बदलत गेली. इराण, इंडोनेशियाकडून सातत्याने भारतीय साखरेला मागणी वाढत असल्याने बंदरांवर कमी मजूर असतानाही साखर निर्यातीसाठी प्रयत्न केले गेले. गेल्या महिनाभरात देशातील विविध बंदरांतून एक ते दीड लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे .अजून ही होत आहे. निर्यातीचा वेग मंद असला तरी या काळात ही निर्यात होत आहे याचे समाधान साखर उद्योगाला आहे. पण निर्यातीचा वेग वाढण्याची गरज आहे ब्राझीलमध्ये वाढणारे साखरेचे उत्पादन ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. भारताला अजूनही निर्यातीची संधी असल्याने कारखान्यांनी जितक्या लवकर शक्य होईल, तितकी साखर निर्यात केली तरच संभाव्य नुकसान कमी होऊ शकते. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com