बीटी बियाणे अहवाल दडपला : धनंजय मुंडे

बीटी बियाणे अहवाल दडपला : धनंजय मुंडे
बीटी बियाणे अहवाल दडपला : धनंजय मुंडे

मुंबई : बीटी बियाण्याला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते, असा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. हा अहवाल शासनाने जाणीवपूर्वक दडपला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

‘‘दैनिक ‘अॅग्रोवन’ने अगदी सुरवातीपासून सातत्याने हा विषय लावून धरला आहे. या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत. म्हणूनच बीटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सरकारनेच शेतकऱ्यावर हे संकट आणले. यामुळे हा एक मोठा कॉटन सीड स्कॅम असून, त्याची चौकशी झाली पाहिजे,’’ अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने राज्य सरकारला बीटी बियाणासाठी दिलेल्या अहवालावर सरकार काहीच कार्यवाही करत नाही, ही बाब लक्षात आल्याने आपण शासनाला ६ जुलै रोजी पत्र लिहून माहिती दिली होती. या पत्राची एक प्रत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यासोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही पाठवली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही असे मुंडे यांचे म्हणणे आहे.

जर सरकारने आपल्या पत्राची दखल घेतली असती तर आज राज्यातील बीटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे झालेली जीवितहानी आणि आर्थिक हानी टाळता आली असती. यामुळे आज बीटी बियाणांच्या प्रादुर्भावामुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. सरकारने केंद्रीय कापूस संशोधन अहवालाकडे दुर्लक्ष केले असल्याने हा एक मोठा ‘कॉटन सीड स्कॅम’ असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com