अमरावती ः कापूस खरेदीचा निर्णय शेतकऱ्यांऐवजी व्यापारी हिताचाच अधिक असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल तर एफ.ए.क्यू. सोबतच फरदड ग्रेडचाही कापूस खरेदी करावा, अशी मागणीही त्यांनी या संदर्भाने केली आहे.
विदर्भात सुमारे १५० लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कापूस लॉकडाऊनमुळे विकल्याच गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यासोबतच हा कापूस कावरलेला असल्याने त्यापासून अंगाला खाजही सुटते. तापमान वाढल्यास आग लागण्याचा धोकाही आहे. त्यामुळे राज्यात कापूस खरेदीची मागणी होती. त्याची दखल घेत राज्यात सोमवार (ता. २०) पासून कापूस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू एफ.ए.क्यू. दर्जाचाच कापूस खरेदी करण्याचे आदेश पणन सचिवांकडून देण्यात आले आहेत. केंद्रावर तासनतास घालविल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा कापूस एफ.एफ.ए.क्यू नसल्याचे सांगत परत केला जाईल. हा कापूस नंतर शेतकऱ्याला व्यापाऱ्याला विकण्यासाठी फिरावे लागणार आहे. त्यामुळे कापूस खरेदीचा उद्देश काय? असा प्रश्न डॉ. बोंडेंनी उपस्थित केला आहे.
कापूस खरेदीची तयारीच नाही कापूस खरेदी विषयक कोणतीच तयारी अद्याप झालेली नाही, असे उत्तर पणनकडून देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बोंडे यांनी दिली. त्यामुळे कापूस खरेदीबाबत अनिश्चितता वाटते, असेही ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.