विकासकामांची उद्‌घाटने, ‘मिसळ पे चर्चे’तून वाढली रंगत

विकासकामांची उद्‌घाटने, ‘मिसळ पे चर्चे’तून वाढली रंगत
विकासकामांची उद्‌घाटने, ‘मिसळ पे चर्चे’तून वाढली रंगत

कोल्हापूर : लाेकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता असल्याने आता जिल्ह्यात विकास कामांच्या उद्‌ घाटनांची लगीनघाई सुरू झाली आहे. या विकासकामांना प्रारंभ करण्याच्या निमित्ताने राजकीय नेते ग्रामीण भागात जाऊन प्रचाराची सुरवात करत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत प्रत्येक तालुक्‍यातील ग्रामीण भागात विकासकामांचे उद्घाटन जोमाने सुुरू झाले आहे.  लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते याचा अंदाज आल्याने ज्या ज्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्याचे उद् घाटन करून स्वत:चा ‘बायोडेटा’ मजबूत करून त्याच्या आधारे मतदारांपुढे जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची धडपड सुरू आहे. जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदारसंघ येतात. कारखानदार, मातब्बर दूध संघांमुळे जिल्ह्यातील राजकारण शेतीपूरक उद्योगावरच चालते. येणाऱ्या निवडणुकीत कारखाने, दूध संघांच्या मार्फत होणारा संपर्क इच्छुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. यामुळे इच्छुक उमेदवार अंदाज घेण्यासाठीही कारखाने, दूध संघांच्या नेत्यांशी भेट देऊन स्थानिक नेत्यांचा कल आजमावत आहेत. विकासकामांच्या निमित्ताने आपल्या विचारांच्या कारखानदारांना, दूध संघांच्या प्रतिनिधींना बोलावून आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.  लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार कमी असले तरी प्रत्येक तालुक्‍यातील कारखानदारांचा गट हा प्रचारासाठी खूप महत्त्वाचा ठरत असतो. यामुळे संबंधित कारखानदारांच्या भेटी घेऊन उमेदवार आपल्या सहकार्य करण्याचे आवाहन करीत असल्याचे चित्र सध्या उस पट्ट्यात आहे.  कोल्हापुरात ‘मिसळ पे चर्चा’ शहरातील वातावरण आजमावण्याकरिता इच्छुक उमेदवार व अन्य राजकीय नेते मिसळ खाण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. शहरातील एखाद्या टपरीवर किंवा लज्जतदार मिसळ मिळणाऱ्या उपहारगृहात कार्यकर्त्यांना जमवून तिथे मिसळ खाण्याचा कार्यक्रम होतो. येथेच संबंधित प्रभागातील नागरिकांशी चर्चा करून कल आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे.  हातकणंगलेत रंगणार साखर युद्ध जिल्ह्यात विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेतीप्रश्‍नाच्या भूमिकेवर वाद प्रतिवाद टोकाचे होण्याची शक्‍यता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी शेतीप्रश्‍नांतून खासदार झाले आहेत. त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात राहणारे उमेदवार श्री. शेट्टींनी घेतलेल्या शेतीप्रश्‍नाविषयक निर्णयाबाबत विरोध करणारे भाष्य करण्याची शक्‍यता असल्याने हातकणंगले तालुक्‍यातील लोकसभेच्या युद्धात ऊस, साखरेचे मुद्दे प्रचारात रंगत आणतील अशी शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com