सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ३९ महसुल मंडळांपैकी आंबोली आणि मसुरे या दोनच महसुल मंडळांतील काजू बागायतदार काजू विमा परताव्यास पात्र ठरले आहेत. त्यांना विमा कंपनीकडुन ९७ लाख रूपये मंजुर झाले आहेत. ही रक्कम पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याची प्रकिया सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना ५४ कोटी २४ लाख ९७ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. अनेक मंडळातील काजू बागायतदारांचे नुकसान होऊन देखील परतावा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.पंतप्रधान पीकविमा योजनेतर्गंत जिल्ह्यातील ४ हजार ६२७ शेतकऱ्यांनी ३ हजार ४५ हजार हेक्टर काजुचे क्षेत्र विमा संरक्षित केले होते. १ कोटी ४० लाख ५२ हजार रूपये रक्कम शेतकऱ्यांनी भरली होती. एकुण ३९ महसुल मंडळे आहेत.
काजु बागांचे गेल्यावर्षी वादळांमुळे मोठे नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नाही. नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने केले आहेत. - हिंदुराव पाटील, शेतकरी, करूळ, ता.वैभववाडी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.