जवाच्या तवा आलं असतं, तर नुकसान दिसलं असतं...

सांगली जिल्ह्यात महापुराने नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. ५) केंद्रीय पथक आले होते. त्यांनी मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील पूरगस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.
जवाच्या तवा आलं असतं, तर नुकसान दिसलं असतं...
जवाच्या तवा आलं असतं, तर नुकसान दिसलं असतं...

सांगली : महापुराने वाहून गेलेला, मोडून पडलेला ऊस, पाण्याने कुजलेली पिकं, वाहून गेलेली शेती, त्या वेळी केंद्रीय पथक आले असते, तर त्याची भीषणता लक्षात आली असती. आता काय राहिले केंद्राच्या पथकाच्या अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी... जवाच्या तवा आलं असतं, तर नुकसान दिसलं असतं.. प्रशासनाने केंद्रीय पथकापुढे आमच्या व्यथा मांडण्यास दिल्या नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सांगली जिल्ह्यात महापुराने नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. ५) केंद्रीय पथक आले होते. त्यांनी मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील पूरगस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, सांगली ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पाटबंधारे विभागाच्या ज्योती देवकर होते. जुलै महिन्यात वारणा आणि कृष्णा काठी महापुराचा फटका बसला. शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौजे डिग्रज येथील महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. त्याच गावात पुन्हा केंद्रीय पथकाने नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र महापूर येऊन सुमारे दोन ते तीन महिने झाले. महापुराने नुकसान झालेल्या शेतीची काय पाहणी करणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला होता. आता इथं महापुराने झालेले नुकसान दिसण्यासारखं काहीच राहिलं नाही. वाहून गेलेला ऊस जनावरांना घातला. पाण्यानं कुजलेल्या पिकांच्या जागी दुसरीच पिकं उभी होती. केवळ आमच्या समाधानासाठी केंद्रातील पथक आले. त्यांनी जुलै २०२१ मध्ये कसा पूर आला याची औपचारिक पाहणी केली आणि माहिती घेतली. २०१९ मध्ये ५० टक्के रक्कम खात्यावर जमा केली होती. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले होते. परंतु यंदा याउलट परिस्थिती आहे. पंचनामे झाले, मात्र नुकसान भरपाई अद्यापही खात्यावर वर्ग झालेली नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई मिळालेली नाही. केवळ सानुग्रह अनुदान दिले असले, तरी हे अनुदान पूर्ण मिळालेले नाही. दरवर्षी महापुराने आमचे मोठे नुकसान होत असून, आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षित ठिकाणी घरे द्यावीत, अशीदेखील मागणी या केंद्राच्या पथकाकडे करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com