महाराष्ट्रातील दुष्काळासाठी केंद्राकडून २१६० कोटी

महाराष्ट्रातील दुष्काळासाठी केंद्राकडून २१६० कोटी
महाराष्ट्रातील दुष्काळासाठी केंद्राकडून २१६० कोटी

मुंबई : दुष्काळाने होरपळून निघालेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी २१६० कोटी रुपयांची मदत केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) ही मदत देण्यात आली आहे.  गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सप्टेंबर महिन्यातच दुष्काळाची चिन्हे दिसू लागली होती. राज्य सरकारने केंद्राच्या निकषाप्रमाणे ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करून मदतीचे स्थायी आदेश लागू केले आहेत. राज्यातील १५१ तालुक्यांतील १७ हजार ९८५ गावे, २६८ महसूल मंडळातील ५ हजार ९० गावे तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली ५ हजार ४४९ गावे अशा एकूण २८ हजार ५२४ गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने जनावरांसाठी १ हजार २६४ चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तर १२ हजार ११६ गावांना ४ हजार ७७४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राज्य शासनाने राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारला सुमारे आठ हजार कोटींच्या मदतीचे निवेदन सादर केले होते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने राज्याला जानेवारी महिन्यात ४ हजार ७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यापैकी २ हजार १६० कोटी रुपयांची मदत नुकतीच वितरित करण्यात आली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com