अखेर शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकार नमले; संघटनांना चर्चेचे निमंत्रण

नव्या कृषी कायद्यांना पंजाबातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर अखेर केंद्र सरकार हरकतीत आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी पंजाबातील आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना १४ ऑक्टोबरला चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
अखेर शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकार नमले; संघटनांना चर्चेचे निमंत्रण
अखेर शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकार नमले; संघटनांना चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना पंजाबातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर अखेर केंद्र सरकार हरकतीत आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी पंजाबातील आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना १४ ऑक्टोबरला चर्चेचे निमंत्रण दिले आहे.  गेल्या महिनाभरापासून पंजाब, हरियाना राज्यात आधी कृषी अध्यादेश आणि नंतर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. नव्या कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांसंदर्भात तरतूद करण्यात न आल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. विशेषत: हमीभावानेच खरेदीच्या तरतुदीचा आग्रह आणि हमीभाव खरेदी व्यवस्था सुरू ठेवण्यासाठीची मागणी या शेतकऱ्यांची आहे.  केंद्रीय कृषी सचिव श्री. अग्रवाल यांनी सर्व २९ संघटनांच्या प्रतिनिधींना राजधानी दिल्लीत कृषी भवनमध्ये सकाळी ११.३० वाजता बैठकीचे निमंत्रण दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com