केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे 

‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील.केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल,’’ असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे येथील अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिले.
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे  Central government will build houses: Narayan Rane
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे  Central government will build houses: Narayan Rane

रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल,’’ असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे येथील अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिले.  केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.२५) रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणच्या अतिवृष्टीबाधित गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला  या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘कोकणात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटाची वेळ ही कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे. बाधित नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.’’  अतिवृष्टीबाधित नागरिकांना प्राधान्य मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह साऱ्याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. बाधित नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस म्हणाले.  व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करणार  रत्नागिरी : चिपळूणमधील व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही सगळी आमच्या घरातील माणसे आहेत. त्यांच्या डोळ्यात भविष्यात अश्रू येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असा दिलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. तसेच चिपळूणवासीयांच्या अश्रूला प्रशासन जबाबदार असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला. राणे म्हणाले, ‘‘राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आणि केंद्रात मी चिपळूणातील लोकांसाठी नुकसान भरपाई मिळवून देऊ. त्यासाठी विविध योजनांचा आधार घेतला जाईल. भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री आढावा घेऊन बैठका घेतील. पण मी थेट पंतप्रधानांना अहवाल देणार आहे. व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही सगळी आमच्या घरातील माणसे आहेत.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com