शेतकरीभिमुख संशोधनाची गरज ः केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह

संशोधकांशी चर्चा करताना केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह
संशोधकांशी चर्चा करताना केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह

नागपूर  ः संशोधकांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्याची गरज आहे. त्या माध्यमातूनच कमी श्रमात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेणे शक्‍य होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मंत्री गिरिराजसिंह यांनी रविवारी भेट दिली. या वेळी त्यांनी संशोधकांशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर या वेळी उपस्थित होते.

गिरिराजसिंह म्हणाले, की संशोधकांविषयी आपल्या नितांत आदर आहे. पशुपालक असल्याने या क्षेत्रातील अडचणींची मला जाण आहे. त्यामुळेच त्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातील. संशोधकांनीदेखील संशोधन करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि व्यावसायिक पिकांचे पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांचा नफा वाढावा, हाच एकमेव उद्देश संशोधनाचा असला पाहिजे. शेतीपूरक व्यवसायात दुग्धोत्पादनात संधी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर देशी गोवंशाची दूध उत्पादकता वाढविणे, वंशावळ सुधारसारख्या उपक्रमांवर भर देण्याची आवश्‍यकता आहे.  या वेळी कुलगुरू डॉ. पातूरकर यांनी विद्यापीठस्तरावरील संशोधनाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com