केंद्रीय पथक करणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   ः राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके बुधवारी (ता. २८) राज्यात दाखल झाली आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. 

यंदाच्या भीषण पूरस्थितीनंतर राज्य सरकारने  ६ हजार ८१३ कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला असून, हा निधी मिळण्यापूर्वीच राज्य सरकारने मदतकार्याला सुरवातही केली आहे. ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाऊस पडल्याने नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती. त्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. बाधित पूरग्रस्त  कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत असून, पशुधन खरेदी, घर बांधकामांसह विविध उपाययोजनांसाठी ६८१३ रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. 

केंद्र शासनाकडून निधी मिळण्याची वाट न बघता राज्य शासनाने आपले मदतकार्य सुरू ठेवले असून, केंद्रीय पथकाकडून या भागांची पाहणी करण्यात येणार आहे. या सात सदस्यांमध्ये कृषी विभागाचे आर. पी. सिंग, व्यय विभागाचे चित्तरंजन दास, ऊर्जा विभागाचे श्री. ओमकिशोर, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जैसवाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी. राजवेदी आणि जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे. हे पथक पूरग्रस्त भागाची चार दिवस पाहणी करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com