केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.
Central team inspects flooded area
Central team inspects flooded area

नागपूर : गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.

विभागीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांकडून झालेल्या पुराच्या आकडेवारी संदर्भातील माहिती घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याला प्रथम भेट दिली. पुराच्या तडाख्याने शेतकरी व गावकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता त्यांच्या लक्षात आली. कामठी तालुक्यात सोनेगाव येथे त्यांनी भेट दिली.

या पथकामध्ये केंद्रीय पथकातील महेंद्र सहारे, एस. एस. मोदी आणि आर. पी. सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व अधिनस्थ अधिकारी तसेच महसूल विभागाचे या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोनेगावचे पायाभूत सुविधायुक्त ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली.

कन्हान नदीच्या पुराचे पाणी पात्र सोडून दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत पसरले होते. त्यामुळे नदीकाठावरील घरे, शेती पिके, सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सुरुवातीला धानाचे पऱ्हे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांची दुबार टाकणी करावी लागली असल्याची माहिती ग्रामस्थांनी पथकाला दिली. स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करून नामदेव राऊत यांचे संपूर्ण घर पुरात वाहून गेले. तर मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेल्याचे संबंधितांनी सांगितले. तर अशोक उमाजी महल्ले यांचे पूर्ण पऱ्हाटीसह शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती श्री. महल्ले यांनी दिली. तसेच नेरीचे शेतकरी गजानन झाडे यांनीही सोयाबीन, कापसाचे नुकसान झाल्याचे सांगितले.

निलज येथील सचिन राजाराम दुपारे या शेतकऱ्याच्या शेतातील पुराच्या पाण्यामुळे टमाटे, मिरची, कापूस, सोयाबीन, धानाचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अगोदरच संकटात‌ सापडलेल्या शेतकऱ्याला कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनी दोन बँकांचे पैसे परत करणार असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले.

पथकाने घेतली आढावा बैठक यापूर्वी केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पथकाला माहिती दिली. विभागात ३४ तालुक्यांतील ८८ हजार ८६४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून भात कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी उर्ध्वनलिकांची नुकसान झाले. विभागात २३ हजार घरांची पडझड झाली असल्याची माहिती श्री. कुंभेजकर यांनी दिली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com