सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली आहे ः छगन भुजबळ

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून दादागिरी करत आहे. ही दादागिरी थांबवण्याची वेळ आता आली असून, त्यासाठी प्रत्येक माणसाने उभे राहण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. सत्ता असूनही पाच वर्षांत विधानसभेत राम शिंदे काहीही बोलले नाहीत, अशी टीका त्यांनी या वेळी केली.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ सोमवारी छगन भुजबळ यांची जामखेड येथे सभा झाली. या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, ‘‘येथील भूमिपुत्राचा मुद्दा उपस्थित केला जात आहे; पण मुळात हा मुद्दा नव्हे तर विकास कोण करतो, याला महत्त्व असते. मीसुद्धा मुंबईत भूमिपुत्र होतो का? मुंबईमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचे पहिले हॉस्पिटल उभारले. विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. राम शिंदे मात्र विधानसभेत पाच वर्षांत काहीही बोलले नाहीत. ओबीसी महामंडळ असूनही काही काम त्यांना करता आले नाही.

जेष्ठ नेते शरद पवार यांनी देश आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी खूप मोठे काम केले. कृषिमंत्री म्हणून आजही त्यांची वेगळी ओळख आहे. सध्याचे कृषिमंत्री कोण आहेत, हे मात्र कोणालाही माहिती नाही. सरकारच्या दादागिरीविरोधात आता प्रत्येकाला उभा राहावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com