सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटील

नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाय, उपाययोजनाबाबत सरकार काम करतेय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे महसूल व पुनर्वसन व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात होत असलेल्या चारदिवसीय ‘किसान आधार’ संमेलनाचे सोमवारी (ता.१५) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, खासदार दिलीप गांधी, 

आमदार शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, की सरकार शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करतेय. २०२२ पर्यंत शेतीची उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. धान्याचा मुबलक साठा असला, तरी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे दिसतेय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वनविभागात चारा घेतला जाणार आहे. पाण्यावर अनुदान देण्याचाही सरकारचा प्रयत्न असेल. सरकार संकटकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. विद्यापीठाचे संशोधन शेतकरी विकासाला मदत करणारे आहे. 

या वेळी राम शिंदे, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, शालिनी विखे पाटील, संजय धोत्रे, खासदार दिलीप गांधी यांची भाषणे झाली. प्रारंभी कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी प्रास्ताविक करून आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २५७ वाण व ३४ विविध औजारे विकसित केले आहे. शिवाय १४०० शिफारसी केल्या आहेत. गतवर्षी संमेलनाला ८० हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत, असे सांगून विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली.  डाॅ. आनंद सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. 

मालदांडीला प्राधान्य द्या! राज्यातील बहुतांश भागात मालदांडी या ज्वारीच्या वाणाला पसंती असते. त्याला अजून आपन १९३५ पासून पर्याय देऊ शकलो नाही. खायला रुचकर असलेल्या मालदांडी ज्वारीच्या वाणाला प्राधान द्या. त्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, त्यात संशोधन व्हावे, असे आवाहन करीत कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी मालदांडी ज्वारीचे कौतुक केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com