रोहित्र बदला; अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : आमदार डॉ. राहुल पाटील

रोहित्र बदला; अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : आमदार डॉ. राहुल पाटील
रोहित्र बदला; अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : आमदार डॉ. राहुल पाटील

परभणी :‘‘कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) वारंवार जळण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांना देण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे जळलेले रोहित्र ४८ तासांमध्ये बदलून द्यावे. अन्यथा, शेतकऱ्यांना प्रतितास ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी,’’ अशी मागणी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पाच्या जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. परंतु, योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने कृषी पंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे मुबलक पाणी असतानाही पिकांना ते वेळोवेळी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

‘‘सन २००५ आणि २०१४ च्या शासन निर्णयानुसार, रोहित्र जळल्यानंतर ४८ तासाच्या आत ते बदलून नवे रोहित्र बसविणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित रोहित्रावर अवलंबून असणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतितास ५० रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी. यात कुचराई करणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे,’’ अशी मागणी डॉ. पाटील यांनी शुक्रवारी (ता.२८) लक्षवेधी प्रश्‍नाच्या माध्यमातून विधानसभेत केली. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सकारात्मक उत्तर दिले. याप्रकरणी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com