शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने अनुभवाल : भुसे

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचत नाही किंवा विद्यापीठ शास्त्रज्ञ बांधावर येत नाही, अशी सातत्याने ओरड होत होती. यावेळी मात्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह शास्त्रज्ञांनाही बांधावर जाण्याचे निर्देश देण्यात आले.
dada bhuse
dada bhuse

नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचत नाही किंवा विद्यापीठ शास्त्रज्ञ बांधावर येत नाही, अशी सातत्याने ओरड होत होती. यावेळी मात्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह शास्त्रज्ञांनाही बांधावर जाण्याचे निर्देश देण्यात आले. परिणामी विद्यापीठाची सारी यंत्रणा कृषी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या शेतावर दिसली राज्याच्या शिवारात असेच सकारात्मक बदल येत्या काळातही अनुभवायला मिळतील, असा विश्‍वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘अ‍ॅग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला. कृषिमंत्री दादा भुसे शुक्रवार (ता.३) ते सोमवार (ता.६) असे तीन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. कृषिमंत्री म्हणाले, ‘‘विदर्भाच्या शिवारात बदलासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पीकपद्धती टप्याटप्याने बदलत भाजीपाला आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. हा बदल एकदम होईल, अशी अपेक्षा करणे रास्त ठरणार नाही. टप्याटप्याने हा बदल निश्चित होईल. त्याकरिता प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी विभाग यांची मदत घेण्यात येणार आहे. गावागावांत बैठका घेत शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रसार करण्यावर भर दिला जाईल.’’  ‘‘कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक काम चांगले केले तरीसुद्धा त्यांच्याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये नकारात्मकता आहे. विद्यापीठाचे कुलगुरू किंवा शास्त्रज्ञ चार भिंतीआड करतात काय? असाच प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात सातत्याने राहतो. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह तज्ज्ञांना देखील बांधावर जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. कृषी सप्ताहापासून याला सुरुवात झाली असली तरी यात सातत्य राहील. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्या संशोधनाला मान्यता दिली तर त्याचा अवलंब अधिक गतीने होते, ही बाब लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,’’ असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

हळदीला मागणी वाढेल राज्यात प्लॅस्टिक बॅगप्रमाणे प्लॅस्टिक फुलांवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच भंडारा, कुमकुम यात रसायनाचा वापर होतो. यावर बंदी लादल्यास राज्यात उत्पादित हळदीला देखील मागणी वाढणार आहे. हे प्रयत्न छोटे असले तरी यातून मोठ्या बदलाची अपेक्षा आम्हाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com