धान खरेदीत अनागोंदी, शेतकरी अडचणीत

छत्तीसगड राज्यातून धान्याची आयात करून व शेतकऱ्यांना थोडे बहुत पैसे देऊन त्यांच्या सात बारावर धान विकून व्यापारी मालामाल होत असल्याची ओरड स्थानिक शेतकरी व नागरिक करीत आहेत.
धान खरेदीत अनागोंदी, शेतकरी अडचणीत Chaos in paddy procurement, farmers in trouble
धान खरेदीत अनागोंदी, शेतकरी अडचणीत Chaos in paddy procurement, farmers in trouble

वैरागड, जि. गडचिरोली : ऐन धान कापणीच्या वेळी तुडतुडा रोगाने हल्ला केल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. असतानाही धान खरेदीचा आकडा नवनवे विक्रम रचत आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातून धान्याची आयात करून व शेतकऱ्यांना थोडे बहुत पैसे देऊन त्यांच्या सात बारावर धान विकून व्यापारी मालामाल होत असल्याची ओरड स्थानिक शेतकरी व नागरिक करीत आहेत. केंद्रावर शेतकऱ्याचे धान खरेदी करीत नसल्याने बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहे.

 दर वर्षी शेतकरी सहकारी सोसायटी व सरकारी बॅंकांकडून पीककर्ज घेऊन आपली शेती करीत असतो. सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकून मार्चमध्ये शेतकरी कर्ज फेडतात. परंतु मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी खर्च जास्त करूनही धानाचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले अनेक शेतकऱ्यांना खायचे वांधे झाले आहेत. मागच्या वर्षीपासून वैरागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्राद्वारे धान खरेदी सुरू करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांकडून धान खरेदी? अनेक शेतकरी व धान्य व्यापारी धान खरेदी केंद्रावर धान नेऊन ठेवल्याने धान खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या वर्षी टोकन पद्धत वापरून अनुक्रमानुसार ज्या शेतकऱ्याचा नंबर असेल, अशा शेतकऱ्यांना ग्रेडरद्वारे फोन करून सांगितले जायचे व त्यांचेच धान खरेदी करीत असते. ही पद्धत एक-दीड महिना सुरळीत चालू होती. नंतर मात्र धान व्यापाऱ्यांनी ग्रेडर यांना हाताशी धरून आपलेच धान विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे नंबर अगोदर होते, अशा शेतकऱ्यांना डावलून ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सात बारा दिला अशाच शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले. यातून ग्रेडर मालामाल झाले आहेत.

ज्या शेतकऱ्याचे धान घरीच पडून आहेत, अशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचे ग्रेडर व अध्यक्ष यांना विचारणा केली असता गोडाऊन फुल्ल झाल्याचे सांगतात. वैरागड धानखरेदी केंद्रावर वैरागडसह वासाळा, वनखी व चामोर्शी गावे येतात. या गावांतील धानाचे पुरामुळे नुकसान झाले आहे.

कसे फेडणार कर्ज ? बॅंकेकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसही पाठविल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत धान विकलेच नाही तर कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. बाहेर राज्यातील धान खरेदी केल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु छत्तीसगड राज्यातून रात्रीच्या वेळी धान्याची आयात करून काही व्यापारी धान खरेदी केंद्रावर धान विकत आहेत. शेतकऱ्यांना दोन-तीन हजार रुपये देऊन काही व्यापारी आपली पोळी भाजून घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com