अमरावती ः ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीप्रश्न गंभीर होतो. त्याची दखल घेत उपलब्ध पाण्याचे स्त्रोत आणि नमुने तपासण्यात यावे, अशी सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राव्दारे केली आहे.
आदिवासीबहूल चिखलदरा, धारणी परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीप्रश्न गंभीर होतो. नागरिकांवर भटकंतीची वेळ येते. दर्यापूर तालुक्यातील सासन, रामापूर, सामदा, करतखेडा, सांगळूद या गावासह अंजनगावसूर्जी तालुक्यातील भातकुली, आसरा, नांदेड, ऋणमोचन, भानखेडा, गोविंदपूर मोगरा, मार्डी, कापूसतळणी, वडणेरगंगाई या गावांमध्ये देखील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यातील बहुतांश गावे खारपाणपट्टयात आहेत.
त्यामुळे शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच त्यांना अवलंबून राहावे लागते. काही गावातील नळ योजनांना चार ते पाच दिवसानंतर पाणी येते. हे पाणी सुरुवातीला गढूळ येत असल्याने नागरिकांमध्ये हे पाणी पिण्यायोग्य की अयोग्य याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस त्यातच लॉकडाऊन यामुळे नागरिकांची चिंता आणखीच वाढली आहे. याची दखल घेत या पाण्याचे स्त्रोत आणि नमुने प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. खासदार राणा यांच्या पत्रातील मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.