मृदा आरोग्य पत्रिकेमुळे खत वापरात १० टक्क्यांपर्यंत घट

soil health card
soil health card

नवी दिल्ली: केंद्र सुरू केलेल्या मृदा आरोग्य पत्रिकेचा सकारात्मक परिणाम शेतीवर दिसून येत आहे. मृदा आरोग्य पत्रिकेमुळे रासायनिक खत वापर ८ ते १० टक्क्यांनी कमी झाला आहे. तर, उत्पादकतेत ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय उत्पादकता परिषदेच्या अभ्यासातून पुढे आला आहे.  शेतकऱ्यांना शेतातील मृदेच्या आरोग्याविषयीची माहिती व्हावी आणि त्यानुसार मृदा पोषणद्रव्यांचा वापर करून उत्पादकता वाढावी यासाठी केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दोन टप्प्‍यात आत्तापर्यंत देशातील २२ कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन आपल्या भाषणात म्हणाल्या, की केंद्र सरकार झिरो बजेट शेतीला प्राधान्य देणार आहे आणि देशात होणारा रासायनिक खतांचा वापर कमी करणार आहे. अर्थसंकल्पात २०२०-२१ साठी खत अनुदानासाठी ७१ हजार ३०९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद २०१९-२० च्या अर्थसंकल्पात दिलेल्या निधीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com