मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

जळगाव : समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चे काढूनही शासनाने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. शासन मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी विलंब करीत आहे. शासनाच्या या बेदरकार वृत्तीने मराठा मोर्चाच्या काकासाहेब शिंदे या युवकाचा बळी गेला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.२४)  केली.

मोर्चाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. या वेळी मराठा मोर्चाचे सुरेंद्र पाटील, डॉ. राजेश पाटील, प्रमोद पाटील, अरविंद पाटील, किरण बच्छाव, राम पवार, योगेश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

सरकारने हमीभावासंबंधी कोणतीच सकारात्मक कार्यवाही न केल्याने शेतकरी आत्महत्या झाल्या. मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.  मराठा मोर्चाच्या मागण्यांसंबंधी शासन विलंब करीत आहे, असे न्यायालयाने फटकारले आहे. या चालढकल वृत्तीमुळेच काकासाहेब शिंदे या युवकाचा बळी गेला. शासन बुद्धीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. दिशाभूल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे या वेळी करण्यात आली.

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com