मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

uddhav thakarey
uddhav thakarey

अमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहिर केल्यानंतर शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील शेतकऱ्यांनी मुख्यत्र्यांशी बोलताना कर्जमुक्ती योजनेविषयी समाधान व्यक्त केले. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सोमवारी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.  ‘‘सातत्याने नैसर्गिक संकटे आल्याने पिकांचे नुकसान होत होते. त्यामुळे कर्जफेड होऊ शकली नाही. मात्र, शासनाने आमची व्यथा जाणून घेतली व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणली. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. मी २०१६ मध्ये एक लाख ६० रुपये कर्ज घेतले होते. ते माफ झाल्याने मला उभारी मिळाली आहे,’’ असे वऱ्हा येथील शेतकरी सुरेशराव कोठेकर यांनी सांगितले. ‘‘माझे ८१ हजार ७३१ रुपयांचे कर्ज माफ झाले. योजनेची प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाहीत,’’ असे सविता प्रकाशराव गाढवे यांनी सांगितले. ‘‘कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुटसुटीत व सुलभ असल्याने काहीही त्रास झाला नाही. तत्काळ कर्जमुक्ती मिळाली,’’ असे शकुंतला सुकळकर यांनी सांगितले. ‘‘माझे २०१६ पासूनचे कर्ज या योजनेमुळे माफ झाले. आता मी नवीन कर्ज घेण्यास पात्र झालो. या योजनेमुळे मला उभारी मिळाली आहे,’’ अशी प्रतिक्रिया सुभाष रावेकर यांनी व्यक्त केली. अमरावती येथील व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, वऱ्हा येथील तलाठी संतोषसिंह गिल आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com