पूरस्थितीवर मात करण्यासाठी सर्व साधनांचा वापर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळ   : राज्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे ही स्थिती उद्भवली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत पूरस्थिती बिकट झाली असून, या संकटावर मात करण्यासाठी सर्व साधनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मंगळवारी (ता. ६) येथील नियोजन समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी फडणवीस म्हणाले, की राज्यात सध्या पूरस्थिती बिकट झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सांगलीतदेखील मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी मी बोलतो आहे. त्यांनी कर्नाटकातील धरणातून विसर्ग वाढविला तर सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकते. दोन्ही राज्यांमध्ये पूरस्थिती धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे उद्भवली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीसंदर्भाने आज (बुधवारी) बैठक घेणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने गृहमंत्रालयाच्या माध्यमातून देखील मदत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com