सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची मदत केली ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने प्रामाणिक आणि पारदर्शक असाच कारभार केला, त्यामुळेच संपूर्ण देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर पोहोचला. शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची मदत केली, आवास योजना प्रभावीपणे राबवली. अशा कितीतरी कामांच्या बळावर पंधरा वर्षांचे आघाडी शासन आणि महायुतीचे शासन याची तुलनी केली, तर आमचे सरकार कितीतरी पटीने सरस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

महाजनादेश यात्रा रविवारी (ता. १५) वाई शहरात दाखल झाली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, बाळा भेगडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजय काकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर उपस्थित होते. 

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून खऱ्या अर्थाने भारत एक केला. त्यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वामुळेच आज देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही. मदनदादा भोसले यांच्यासारखा खूप जुना मित्र सोबत असल्याने वाई मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com