सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. सर्व जिल्ह्यात चुरशीने मतदान होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात एका ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित ६६ ग्रामपंचायतीच्या ४९४ जागांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांची गर्दी मतदान केंद्राबाहेर दिसून येत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत ४५ टक्के तर दुपारी तीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील खांबाळे टेंबवाडी येथील मतदान यंत्रात बिघाड झाला. ही माहिती मिळताच तहसीलदार रामदास झळके यांनी तत्काळ मतदान यंत्रात बदल करून मतदान प्रकिया पूर्ववत केली. अर्धातास मतदान प्रकिया रखडली होती. त्यामुळे मतदारांची मोठी रांग मतदान केंद्राबाहेर लागली होती. खांबाळे व्यतिरिक्त कुठेही मतदान प्रकियेत खंड पडलेला नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.