पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. मराठवाडा व विदर्भात काहीसा उन्हाचा चटका असल्याने शनिवारी (ता. १५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी आहे.
पुढील काही दिवसांत मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात चांगलेच बदल होत आहेत. तर विदर्भ व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ढगाळ वातावरणामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. सोलापूर, नगर या भागांत पाऊस झाल्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला आहे.
कोकणातही तुरळक ठिकाणी सरी बरसल्याने उकाडा कमी झाला आहे. कोकणात कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर मध्य महाराष्ट्रातही कमीअधिक स्वरूपात कमाल तापमान असल्याने जळगाव, मालेगाव भागात पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर होता. इतर भागांत पारा ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होता. मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या झळा काही प्रमाणात तीव्र होत्या.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस रविवार : संपूर्ण महाराष्ट्र सोमवार ः पालघर, भंडारा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ मंगळवार ः अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, उर्वरित भागांत ढगाळ वातावरण बुधवार ः मुंबई, नगर, औरंगाबाद, जालना जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण शनिवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.