अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर निवडणूक लादली : मुख्यमंत्री

अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर निवडणूक लादली :  मुख्यमंत्री
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर निवडणूक लादली : मुख्यमंत्री

भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले म्हणून पोटनिवडणूक घ्यावी लागली; पण भंडारा-गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदारांच्या अहंकारामुळे ही निवडणूक जनतेवर लादली गेल्याची टीका केली.  मोहाडी येथील हुतात्मा स्मारकाजवळील पटांगणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे, आमदार हेमंत पटले, आमदार अनिल सोले, चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर कोहळे, राजेश पटले, भाऊराव तुमसरे, माजी आमदार हरीश मोरे, आनंद राऊत यांची या वेळी उपस्थिती होती.  मुख्यमंत्री म्हणाले, रावणाचा निःपात अहंकारानेच केला. कौरवदेखील अहंकारामुळेच संपले. त्याच धर्तीवर माजी खासदारांच्या अहंकाराचा निःपातदेखील मतदार करतील. या खासदाराने २००९ मध्येही असाच राजीनामा दिला होता. त्या वेळी लोकांचे सहकार्य मिळाले असेलही; पण नंतर लोकांना कळाले हा राजीनामा शेतकऱ्यांसाठी नव्हता, मतदारांच्या फायद्यासाठी नव्हता तर स्वस्वार्थासाठी होता. त्यामुळे लोकांच्या मनात या राजीनाम्याबद्दल तीव्र आक्रोश आहे. हा आक्रोश मतपेट्यांमधून दिसणार आहे. हेमंत पटले यांना निवडूण देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com