दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री भेटले पंतप्रधानांना

दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री भेटले पंतप्रधानांना
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री भेटले पंतप्रधानांना

नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथे केली.पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.  दरम्यान, व्यवसाय सुलभता (इझ ऑफ डुइंग बिझनेस) निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १३) सायंकाळी पंतप्रधान श्री. मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती देतानाच त्याबाबत राज्य सरकारने विविध पातळ्यांवर केलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांना अवगत केले. या परिस्थितीवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यास तातडीने मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केंद्राकडे ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीची यापूर्वीच मागणी केली असून, ही मदत लवकर मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com