नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
अॅग्रो विशेष
अनेक भागांत थंडी कमी
राज्यात असलेल्या हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून, उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागले आहे.
पुणे ः राज्यात असलेल्या हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून, उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागले आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि गोवा व कर्नाटकाची किनारपट्टीदरम्यान चक्रीय स्थिती आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडी कमीअधिक होत आहे. येत्या आठ दिवस काही ठिकाणी थंडी किचिंत राहणार असली तरी मागील तीन ते चार दिवसांपासून हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंडी वाढत असली तरी पहाटे किंचित थंडी असते. सध्या राज्यातील सर्वच भागात किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर, नांदेड वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
कोकणात थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तामपान १९ ते २१ अंश सेलिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीत चढ-उतार असल्याने किमान तापमान ११ ते २१ अंश सेल्सिअस एवढे आहे. मराठवाड्यात थंडी गायब होऊ लागली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानात घट आढळून येते.
रविवारी (ता.२८) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१)
- ठाणे १९.८
- अलिबाग २१.३ (२)
- रत्नागिरी २१ (१)
- डहाणू २१ (२)
- पुणे १४.४ (१)
- नगर १७.५ (३)
- जळगाव १५.७
- कोल्हापूर २१ (३)
- महाबळेश्वर १७.५ (२)
- मालेगाव १८.२ (५)
- नाशिक १६.१ (३)
- निफाड ११
- सांगली २० (३)
- सातारा १६.५ (१)
- सोलापूर १८ (५)
- औरंगाबाद २१ (५)
- बीड १९.३ (३)
- परभणी १९ (२)
- परभणी कृषी विद्यापीठ १३
- नांदेड १५ (-१)
- उस्मानाबाद १८ (१)
- अकोला १८.५ (१)
- अमरावती १९.३ (१)
- बुलडाणा २०.१ (२)
- चंद्रपूर १७.६ (-१)
- गोंदिया १६.५
- नागपूर १७.२
- वर्धा १८ (१)
- यवतमाळ २० (१)