पुणे ः उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमीअधिक स्वरूपाची राहील. सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
उत्तर भारतासह राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मागील काही दिवस ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी अवकाळीसह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप देत अचानक हवेत गारवा पसरल्याने किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा हवेतील गारवा कमी झाल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. विदर्भ वगळता उर्वरित सर्वच भागात थंडी कमीअधिक असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
सध्या राज्यात आकाश निरभ्र असले तरी काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे काही प्रमाणात थंडी पुन्हा कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रात १३ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
विदर्भातही अजूनही बऱ्यापैकी थंडी कायम आहे. गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.
सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.