पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडीत चढ-उतार राहणार आहे. रविवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
लक्षद्वीप परिसर ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र हे ढगाळ वातावरण फारसे अधिक नाही. त्यामुळे काही प्रमाणात थंडी अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी कमीअधिक स्वरूपात असल्याने किमान तापमान १० ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. कोकणात ढगाळ वातावरणाचा प्रभाव काहीसा असल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
मराठवाड्यातील काही भागांत थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर इतर भागांतही थंडी काहीशी असल्याने किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही चांगलीच थंडी होती. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती.
रविवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.