हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी गुरुवार (ता.२५) पर्यंत ३३ हजार २७९ शेतकऱ्यांना १६६ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांचे (१४.२२ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. ग्रामीण बॅंकेने कर्जवाटपात गती घेतली आहे. परंतु, व्यापारी बॅंका मात्र अद्याप पिछाडीवर आहेत.
जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या खरिपात १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात व्यापारी बॅंकांना ८५९ कोटी १० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी ९६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४८ कोटी ८९ लाख रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे.
जिल्हा बॅंकेने आजवर २० हजार ६१५ शेतकऱ्यांना ५१ कोटी ५७ लाख ५९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट आहे. परंतु, या बॅंकांनी अद्याप पीक कर्जवाटपात गती घेतलेली नाही. व्यापारी बॅंकांनी आजवर ७ हजार ९९४ शेतकऱ्यांना ८२ कोटी २० लाख ९७ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची कर्जवाटपाची गती वाढली आहे. या बॅंकेने आजवर ४ हजार ६७० शेतकऱ्यांना ३२ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. बॅंकनिहाय पीक कर्जवाटप (कोटी रुपये )
बॅंक | शेतकरी संख्या | कर्जवाटप | टक्केवारी |
जिल्हा बॅंक | २०६१५ | ५१.५७ | ३४.६४ |
व्यापारी बॅंक | ७९९४ | ८२.२० | ९.५६ |
म.ग्रा.बॅंक | ४६७० | ३२.३३ | २०.०८ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.