कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती स्थापन

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील (कर्जमाफी) तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सहकार विभागाने तालुका पातळीवर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने अपात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी दर आठवड्याला बैठक घेऊन, कर्जमाफी मिळण्यासाठी मदत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.  कर्जमाफी योजनेत खात्यांची अपुरी माहिती, चुकीची माहिती शेतकरी किंवा सुविधा केंद्र आणि शासनाच्या व्यक्तींकडून झाली असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. तर या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्जपुरवठा होत नसल्याच्या देखील तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा करत, पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि पुन्हा कर्ज मिळण्यासाठी तालुका निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा बॅंकेचा संबधित तालुका प्रतिनिधी, अग्रणी बॅंकेचा तालुका प्रतिनिधी, लेथा परिक्षक आणि सहकार विभागाच्या उच्चश्रेणीच्या अधिकारी  सदस्य सचिव असणार आहे. या समितीने प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन, अपात्र आणि तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करत त्यांना पात्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com