जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी, हरभऱ्याच्या आवकेत घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी, बाजरी, हरभरा या धान्यांची आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांकडून स्थानिक क्षेत्रातील आवक जवळपास बंद झाली आहे. केवळ व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार सध्या होत असल्याची स्थिती आहे. 

शेतकरी खरिपाच्या लगबगीत आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरिपासाठी शेतकऱ्यांनी आपल्या धान्याची विक्री मे व जूनमध्ये बाजार समितीत केली. यानंतर स्थानिक क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होणारी आवक कमी होत गेली. यातच बाजार समितीमध्ये कुंपण भिंत पाडण्यावरून अडतदारांनी जून व जुलैमध्ये सुमारे २५ दिवस बंद पाळला. त्यामुळे बाजारातील धान्याची आवक थांबली.

अनेक शेतकऱ्यांनी चोपडा, अमळनेर बाजारात धान्य पाठविले. यादरम्यान ज्या शेतकऱ्यांनी बाजारात धान्य आणले, त्याची विक्री अजूनही झाली नाही. अनेक शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी अडतदारांकडे पडून आहे. अडतदार, व्यापारी मंदीचे कारण सांगत आहेत.

धान्याचे दरही दबावातच राहिल्याचे सांगितले जात होते. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे धान्य होते, त्यांनी ते बाजारात आणले नाही.  गत आठवड्यात बाजारात ज्वारीची प्रतिदिन २० क्विंटल आवक झाली. इतर कुठल्याही धान्याची आवक झाली नाही. बाजरी, हरभरा यांची आवक शून्यावर आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com