नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी?

Compensate for the heavy rainfall
Compensate for the heavy rainfall

नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनसंसदेकडून करण्यात आला आहे. 

ऑक्‍टोबर- नोव्हेंबर २०१९ मध्ये नगरसह राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मागील खरिपातील पिके, फुलशेती व फळबागांचेही नुकसान झाले. भारतीय जनसंसदेने ज्याच्या नावावर शेती आहे, त्या प्रत्येकाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मात्र, शासनाने ठरावीक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले. पंचनामे होताना फक्त सोयाबीन व कांदापिकाचे पंचनामे केले. तो निवडणुकीचा काळ असल्याने, बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी हेक्‍टरी २५ हजार रुपये भरपाईची मागणी केली. मात्र, राज्यपालांनी प्रतिगुंठा अवघी ८० रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. ही ८० रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाईही अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 

या प्रक्रियेत सर्वाधिक गोंधळ घालण्याची परंपरा नगर तालुक्‍याने नेहमीप्रमाणे कायम राखली. २०१८चे दुष्काळी अनुदान अद्याप नगर तालुक्‍यातील अनेकांना मिळालेले नाही. काही ठिकाणी पंचनामे झाले; मात्र यादीत शेतकऱ्यांची नावेच नाहीत. तलाठ्यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या यादीतील नावे गायब झाली. हेक्‍टरी आठ हजार रुपये नुकसानभरपाई असताना, अनेकांना क्षेत्रापेक्षा कमी रक्कम प्राप्त झाली आहे. एकाही शेतकऱ्याला क्षेत्रापेक्षा जास्त रक्कम मिळालेली नाही. 

नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी, अन्यथा नगर तालुक्‍याच्या महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलनाचा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com