डाळिंब उत्पादकांना नुकसानभरपाई द्या : संख

डाळिंब उत्पादकांना नुकसानभरपाई द्या :  संख
डाळिंब उत्पादकांना नुकसानभरपाई द्या : संख

सोलापूर  : पावसाने राज्यभरातील डाळिंब उत्पादकांचे कोट्‌यावधीचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळात कशाबशा बागा जगवल्या. त्यात आता ओल्या दुष्काळाने त्याही हातच्या गेल्या. डाळिंब उत्पादकांचे कधीच भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन भरीव मदत द्यावीच, पण संपूर्णपणे कर्जमाफीही द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख यांनी प्रशासनाकडे केली. 

संख यांनी यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, या आधीच कोरड्या दुष्काळात डाळिंब उत्पादक पाण्याअभावी अडचणीत होते. अनेक भागात बागा गेल्या. त्याचे पंचनामे अद्यापही झाले नाहीत. झाले त्यांना भरपाई मिळाली नाही. त्यात आता ओल्या दुष्काळाची भर पडली आहे. निसर्गाच्या अशा दुहेरी संकटात डाळिंब उत्पादक अडकला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील सोलापूर, सांगली, नाशिक, परभणी, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यात सर्वाधिक डाळिंब बागायतदारांचे नुकसान झाले आहे. मृग आणि हस्त असे दोन्ही बहार त्यामुळे अडचणीत आले आहेत. डाळिंबाची फुलगळ, फळकूज यासारखे प्रकार घडले आहेत.

या प्रकारामुळे राज्यातील ७५ टक्के डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. अति पावसाने नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन भरीव मदत द्यावी, तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी द्यावी, असेही संख यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com