नुकसानभरपाईच्या निर्णयाची अंमलबजावणी करा ः जाधव

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांच्या वीजपंपाची जोडणी खंडित न करण्यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे निविष्ठा अनुदान द्यावे.’’
Compensation decision Implement: Jadhav
Compensation decision Implement: Jadhav

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या वीजपंपाची जोडणी खंडित न करण्यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे निविष्ठा अनुदान द्यावे,’’ अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विभागीय आयुक्‍तांकडे मंगळवारी (ता.२) निवेदनाद्वारे केली.

निवेदनानुसार, खरीप हंगामात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले. काही तालुक्ंत शासनाने नुकसान भरपाई घोषित केली आहे. उर्वरित तालुक्‍यामध्ये पीक आणेवारी ५० पैशाच्या आत आली आहे. यावरून शेतीचे नुकसान झाल्याचे शासनाने मान्य केले. २०१५ मधील राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शासनातर्फे उपाययोजना होणे अपेक्षित आहे. 

पाच हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या

या वेळी ५ हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन व शासनाचे परिपत्रकही जोडण्यात आले. निवेदन देतेवेळी अभियंता महेश गुजर, राजू शिंदे, सुनील बोडखे, भाऊसाहेब शेळके, विठ्ठल कुंजर आदींची उपस्थिती होती. बैलगाडीने विभागीय आयुक्‍तालयाकडे जाऊन हे निवेदन देण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्‍तालयासमोर बंदोबस्त होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com