कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी: कांदा निर्यातीबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्याना न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरूवारी (ता.१७) केंद्रातील भाजप सरकार विरोधात जिल्हा काँग्रेसने घोषणाबाजी केली.
Congress agitation in Ratnagiri against onion export ban
Congress agitation in Ratnagiri against onion export ban

रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्याना न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरूवारी (ता.१७) केंद्रातील भाजप सरकार विरोधात जिल्हा काँग्रेसने घोषणाबाजी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. 

जगभरात लॉकडाउन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्‍यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव आल्याचे दिसत आहे. चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला.

४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. दरम्यान, ३ महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

कांदा उत्पादन शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन न्याय द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसने हे आंदोलन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com