काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम विदर्भात

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम विदर्भात
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम विदर्भात

मुंबई : राज्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरवात आज (ता. ४) यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून होणार आहे. ही यात्रा पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतून प्रवास करून ९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विराट जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राची गेल्या चार वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे. राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही. महिलांवरील अत्याचाराच मोठी वाढ झाली आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे ही जनसंघर्ष यात्रा काढली जात असल्याचे सांगण्यात आले.  काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com