कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग पिकवणाऱ्यांचा का नाही?

कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग पिकवणाऱ्यांचा का नाही?
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग पिकवणाऱ्यांचा का नाही?

नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारच्या एम.एम.टी.सी. व्यापार कंपनीने दोन हजार टन कांद्याच्या आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीचे मूल्य टनाला ८५० डॉलर इतके निश्‍चित केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. खाणाऱ्यांचा विचार होतो, मात्र शेतकऱ्यांचा विचार का होत नाही? असा संतप्त सवाल शेतकरी करत असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. समाजमाध्यमावर त्यांचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 

राज्यात कांद्याचे दर वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून योग्य दर नसल्याने शेती तोट्यात आहे. त्यात आता कुठं कांद्याचे दर वाढले आहेत, तर सरकार बाहेरुन कांदा आयात करत आहे. सरकारसाठी पाकिस्तानपेक्षा भारतीय शेतकरी जास्त मोठे शत्रू वाटत आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत असताना कांदा उत्पादकाला अडचणीत आणण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा संतापजनक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. 

केंद्र शासनाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळे दोन निर्णय घेत दोन मोठे धक्के दिले आहेत. परदेशातून कांदा आयात करण्याची निविदा काढल्यानंतर कांदा निर्यातमूल्यात तब्बल ८५० डॉलरची वाढ केली जाणार आहे. या दोन्ही निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण होणार आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत.

सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नाशिक, नगर, पुणे येथे अजूनही शेतकऱ्यांकडे चाळीत कांदा शिल्लक असताना शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुटपुंज्या आयातीचे चित्र निर्माण केले आहे. कांदा उत्पादकांचा व विरोधकांकडून टीकेचा भडीमार झाल्यामुळे आयातीचा निर्णय मागे घेण्यात आला. हे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. - कुबेर जाधव, शेती प्रश्नाचे अभ्यासक, देवळा.

सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आले आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताला विरोध आहे. कांद्याचे दोन पैसे मिळत असताना सरकारच्या पोटात गोळा उठला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने कांद्याच्या बाबतीत धीराने अवलंबले तर शेतकरी सरकारला जागा दाखवून देतील.- गोविंद पगार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक जिल्हा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com