पंधरा वर्षे खड्डे पडणार नाहीत अशा रस्त्यांची निर्मिती : चंद्रकांत पाटील

पंधरा वर्षे खड्डे पडणार नाहीत अशा रस्त्यांची निर्मिती : चंद्रकांत पाटील

सोलापूर : ''किमान पंधरा वर्षे कोणत्याही प्रकारचे खड्डे पडणार नाहीत अशा रस्त्यांची निर्मिती महाराष्ट्रात केली जाणार आहे'', असे राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

येथील बांधकाम भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''भारतमाला योजनेंतर्गत सहा हजार कोटी मिळाले. त्यातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवर सहापदरी आणि चार पदरी रस्ते होतील. किमान पंधरा वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत अशा पद्धतीचे रस्ते तयार केले जाणार आहेत.'' 

''महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांचा प्रवासासाठी मी निघालो आहे. आतापर्यंत 24 जिल्हे फिरून झाले आहेत. यापूर्वी रस्त्यासाठी मुबलक तरतूद नसल्याने रस्ते चांगले झाले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडणे आणि ते डिसेंबरमध्ये बुजविणे हे रुटीन आहे. विरोधकांनी यंदा त्याचा जास्त बाऊ केला. त्यामुळे आम्ही सगळ्या विभागासह बाहेर पडलो आहोत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे शंभर टक्के भरू शकू याचा आत्मविश्‍वास आहे.'' 

''येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे 22 हजार किलोमीटरपर्यंतचे रस्ते होतील. त्यासाठी केंद्र शासनाने 1 लाख 6 हजार कोटी रुपये मंजूर केले. तीन वर्षात ही रक्कम मिळेल. या वर्षीच्या हिश्‍याची रक्कम उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाने इतिहासात पहिल्यांदा रस्त्यांसाठी 30 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून 10 हजार किलोमीटरचे रस्ते होतील. म्हणजेच एकूण 32 हजार किलोमीटरचे रस्ते होतील'', असेही श्री. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com