नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पपईच्या लागवडी बाधित

सततच्या पावसामुळे पपईच्या लागवडी बाधित
सततच्या पावसामुळे पपईच्या लागवडी बाधित

नाशिक  : गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे पट्ट्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. यात खरीप पिकांसह व इतर नगदी पिके नेस्तनाबूद झाली आहेत. या संकटात सुरवातीला द्राक्ष व डाळिंब बागांना फटका बसला होता. मात्र, देवळा तालुक्यातील पपईच्या लागवडी बाधित झाल्या असून झाडांनी माना टाकायला सुरवात झाली आहे.  देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात पपईचे पीक ही सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पपईची लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी चांगले दर मिळत असल्या कारणाने पपई उत्पादक समाधानी होते. परंतु, सुरवातीला झालेली अतिवृष्टी, परिसरात नद्यांना आलेला महापूर त्यामुळे पपई नदीत वाहून गेली होती. आता १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे इतर पिकांबरोबर पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले फळ खराब होत असून अतिप्रमाणात पाणी झाल्यामुळे पाणगळती व रोगांमुळे झाडे वाळून जात आहे. फळांना कीड लागल्याने सडवा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे झाडांची फळे तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  शासनाने नुकसानभरपाई देण्यासाठी इतर फळबांगाबरोबर पपईचाही समावेश करण्यात यावा. एकरी १ लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विठेवाडी येथील पपई उत्पादक दिनकर जाधव, रवींद्र बोरसे, निंबा निकम, माणिक निकम, काशिनाथ बोरसे आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com