कमी कालावधीच्या वाणातूनच बोंड अळीचे नियंत्रण ः डॉ. वाघमारे

कमी कालावधीच्या वाणातूनच बोंड अळीचे नियंत्रण ः डॉ. वाघमारे
कमी कालावधीच्या वाणातूनच बोंड अळीचे नियंत्रण ः डॉ. वाघमारे

चंद्रपूर  ः कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता तिचा जीवनक्रम खंडी होणे गरजेचे आहे. त्यासाठी खोडवा न घेणे किंवा कमी कालावधीच्या कापूस वाणांच्या लागवडीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी केले.  केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्‍त सहकार्याने वरोरा येथे आयोजित कापूस मेळाव्यात ते बोलत होते. कीडनाशक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार पुरस्कृत प्रकल्पातून हा मेळावा घेण्यात आला. जिल्हा प्रकल्प समन्वयक डॉ. व्ही. चिन्ना बाबू नाईक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक नगराळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन प्रकल्पाचा अहवाल सादर केला. विस्तार शिक्षण तज्ज्ञ डॉ. एस. एम. वासनिक यांनी कापूस उत्पादकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-कापूस या उपक्रमाविषयी माहिती दिली. रंगीत कापसाचे उत्पादन, कपाशीच्या विविध प्रगत जाती या विषयावर डॉ. विनीता गोतमारे यांनी मार्गदर्शन केले. कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी या विषयावर डॉ. बाबासाहेब फंड यांनी सांगितले. डॉ. दीपक नगराळे यांनी कपाशीत विविध रोग तसेच त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com