कोकणसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकणात नारळाची लागवड स्वतंत्र बागेत आणि राज्यात इतर ठिकाणी बांधावर, परसबागेत किरकोळ स्वरूपात केली जाते. रोग व्यवस्थापन कोंब कुजव्या
हवेमध्ये जास्त आर्द्रता आणि कमी तापमान झाल्यास रोगाची वाढ झपाट्याने होते. रोगामुळे कुजलेला संपूर्ण भाग बाहेर काढावा आणि तो भाग साफ करावा. साफ केलेल्या भागामध्ये १ टक्का बोर्डो मिश्रण ओतून, त्यावर आच्छादन टाकून झाकावे. माशी रस शोषून शरीरातून गोड चिकट स्राव सोडते. त्याकडे असंख्य मुंग्या आकर्षित होऊन स्राव सर्वत्र पानावर पसरतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. बागेमध्ये उच्च दाबाच्या पाण्याची (पावर स्प्रे) फवारणी करावी. १ टक्का स्टार्च सोल्यूशनची फवारणी करावी. माशीला आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत. भुंग्याचा प्रादुर्भाव माडाच्या खोडावर आढळतो. खोडावर छिद्रे पडून त्यातून ताजा भुसा बाहेर येतो. शेंड्यावर प्रादुर्भाव झाल्यास सुई किंवा कोंब निस्तेज होऊन शेंडा मोडून पडतो. बागेमध्ये कामगंध सापळे लावावेत. जुने पडलेले माड नष्ट करून बाग स्वच्छ करावी. भुंगा माडाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. नवीन वाढणारी सुई पोखरल्याने झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. बागेत २ बाय २ बाय २ फूट आकाराचे फसवे खड्डे काढून निरीक्षणे घ्यावीत. त्यामध्ये मिळालेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. मिटारायझिअम हे जैविक कीडनाशक ५० ग्रॅम प्रतिखड्डा या प्रमाणात टाकावे. झाडांच्या बुंध्यात साफसफाई करून पावसामुळे वाहून गेलेली माती पुन्हा लावून मुळे संरक्षित करावीत. बागेत ओलावा असला तरी ठिबक सिंचन संचाने पाणी देणे सुरू करावे. बागेमध्ये बुंध्यापासून २ मीटर अंतर सोडून हलकी नांगरट करावी. बागेतील गवत तसेच बुंध्यावरील झुडपे काढून बाग स्वच्छ करावी. संपर्कः डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)