vijay javandhiya
vijay javandhiya

उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी नको ः विजय जावंधिया

पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर मिळत असून, निर्यातीला चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षी ५० लाख गाठींची निर्यात झाली होती. यंदा ६० लाख गाठींच्या निर्यात अपेक्षित आहे. यामुळे केंद्र सरकारने कापड उद्योगांच्या दबावाखाली येऊन कापूस निर्यात बंदी करू नये, असे आवाहन आणि पत्र शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.  जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे, की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कापूस निर्यात बंदी रद्द करण्याबाबत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. या पत्रात मोदींनी निर्यात बंदी रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. त्या वेळी कापसाला ६ हजार ५०० ते ७ हजार २५० रुपये प्रति क्विंटल दर होता. सध्या कापसाला ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत असतानादेखील केंद्र सरकार कापसाची निर्यात बंदी करत आहे. २०११ मध्ये गुजरातमधील कापसला एवढे चांगले दर मिळत असताना देखील मोदींनी निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली होती. मात्र आता त्यापेक्षाही कमी दर असताना कापड उद्योगांच्या दबावाखाली निर्यात बंदी करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या २०११ च्या पत्राची आठवण ठेवत कापसाची निर्यात बंदी करू नये.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com