भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. जगातील एकूण कापूस उत्पादनापैकी २५ टक्के कापूस एकट्या भारतात पिकतो. तसेच भारत हा कापसाचा खप आणि निर्यात या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण तरीही भारतीय कापूस बाजारपेठेला कमी उत्पादन आणि अस्वच्छ कापूस या दोन आव्हानांशी झुंज द्यावी लागत आहे. मुख्य आव्हाने
उपाययोजना
जमीन
हवामान
कापूस तंत्रज्ञान अभियान
तंत्रज्ञान
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)
मार्केटिंग लिंकेजेस
बाजार समित्यांची पुनर्रचना
पीकविमा
लघू उद्योग
स्वच्छ कापूस अभियान
कापूस खरेदीबाबत चीनचा हात आखडताच यंदा कापसाची बाजारपेठ हवामान, सरकारी धोरणे आणि मागणी या तीन घटकांभोवतीच फिरणार, हे वारंवार सिद्ध होत आहे. जून-जुलैमध्ये कापसाची चांगली लागवड झाल्याचे चित्र असतानाही रईचे भाव वाढले. याचे कारण म्हणजे मागणीत झालेली वाढ. तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्टॉक कमी असूनही रईच्या दरात घसरण झाली. कारण, मागणी खूपच मर्यादित राहिली आणि निर्यातदारही शांत राहिले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही मागणीत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सूत आणि कपड्याच्या बाजारपेठेत उठाव नसल्यामुळे खरेदीदारांनी धिम्या गतीने खरेदी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यंदा देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे उत्पादन कमी होणार, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. विपरीत हवामानामुळे यंदा कापसाची उत्पादकता घटली आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशा या राज्यांत कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय), युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर(यूएसडीए), इंटरनॅशन कॉटन ॲडवायजरी कमिटी (आयसीएसी) यांच्यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारतातील कापूस उत्पादनात घट होणार असल्याच्या अंदाजाला पुष्टी दिली आहे. ‘कॉटनगुरू‘च्या टीमने गेल्या चार महिन्यांत देशातील प्रत्येक कापूस उत्पादक राज्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची अवस्था, उत्पादकता व उत्पादनाचे अंदाज यावर बारीक नजर ठेवली होती. त्या आधारावरच यंदा देशात कापूस उत्पादनात घट होणार असल्याचे भाकित केले होते. परंतु, उत्पादन कमी असूनही कापसाच्या बाजारपेठेत दरात तेजीचे संकेत दिसत नाहीत. बाजारात अजूनही मंदीचाच प्रभाव दिसत आहे. याचे कारण काय? याचा थेट संबंध आहे तो सरकारच्या धोरणांशी. केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरीव वाढ करून शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी वस्त्रोद्योग क्षेत्रावर टाकली. परंतु, दुसरीकडे या उद्योगाला अधिक सक्षम करण्याच्या बाबीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणजे सध्या उद्भवलेली मंदीची स्थिती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध (ट्रेड वॉर) भडकले आहे. त्याचा लाभ उठवण्यात भारताला अद्याप तरी यश आलेले नाही. या व्यापारयुद्धामुळे चीन अमेरिकेकडून कापूस खरेदी करणार नाही, तर मग त्याला भारताशिवाय अन्य पर्याय नाही, अशा समजुतीत आपण राहिलो. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अमेरिकेतील कापूस स्वस्त असेल तर चीन अप्रत्यक्षरित्या इतर कोणत्या तरी स्राेताच्या माध्यमातून अमेरिकी कापूस खरेदी करू शकतो. या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. हाॅँगकाॅँगमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंटरनॅशनल कॉटन असोसिएशनच्या (आयसीए) संमेलनात याचा प्रत्यय आला. या संमेलनात सहभागी झालेल्या ६०० प्रतिनिधींमध्ये १२० जण भारतीय होते. पण, तरीही त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. एकीकडे चिनी निर्यातदार शांतपणे आपले सौदे मार्गी लावत होते, तर भारतीय निर्यातदारांची मोठी धावपळ सुरू होती. तरीही त्यांच्या पदरात अत्यंत मर्यादित सौदे पडले आणि त्यांचे मूल्यही कमी होते. मुंबईत २००७ मध्ये ‘आयसीए‘च्या संमेलनात नेमके उलट चित्र होते. त्या वेळी ५०० पैकी २०० जण चीनचे प्रतिनिधी होते आणि ते भारतीय निर्यातदारांच्या अपॉर्इटमेंट्स घेत फिरताना दिसत होते. हाॅँगकाॅँगमधील संमेलनातून हे स्पष्ट होते की, चीनने कापूस खरेदीबाबत अजूनही आपले पत्ते पूर्णपणे उघड केलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात पूर्ण आठवडा दरात नरमाई असताना गुरुवार (ता. १) पासून अमेरिकी वायदेबाजारात दर वाढत असल्याचे दिसून आले. अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे कापसाच्या बाजारपेठेत अनिश्चितता कायम राहील, असे एकंदर चित्र आहे. देशातील स्थानिक बाजारपेठेत नरमाईचे वातावरण आहे. मर्यादित मागणी आणि रोकडटंचाई यामुळे खरेदीदार थंड आहेत. दिवाळीनंतर कापसाची आवक वाढल्यानंतर दरात घट होईल आणि गिरण्यांकडून खरेदी वाढेल, असा जिनर्सचा अंदाज आहे. यंदा उत्पादन कमी असले तरी मालाची गुणवत्ता चांगली राहील, हीच त्यातल्या त्यात काहीशी दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. (लेखक कापूस बाजार विश्लेषक असून, ‘कॉटनगुरू‘चे प्रमुख आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.