नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा प्रादुर्भाव

disease cotton plant protection
disease cotton plant protection

नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये पाणी साचून राहिल्याने कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी बोंड अळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना चालू वर्षी करपा रोगाचा कपाशीवर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

कपाशीचे पीक नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील प्रमुख नगदी पीक आहे. प्रामुख्याने येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यामध्ये लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. झालेल्या अतिवृष्टीमुळे हलक्या व पाणी साचलेल्या जमिनीवर असलेल्या लागवडीला करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. 

येवला तालुक्यातील पूर्व भागात राजापूर, सोमठाणे या भागात लाल्या विकृती आढळून आली आहे. यामुळे कपाशीच्या झाडांची पाने लाल होऊन वाळत आहेत. या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम उत्पादनावर होणार आहे. अनेक शेतकरी ४ ते ५ तोडे घेतात. मात्र या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दोन किंवा तीनच तोडे होतील, अशी भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी दुष्काळ असतो. या वर्षी जरी चांगला पाऊस झाला असला, तरी मात्र करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्गाची निराशा झाली आहे. 

पाऊस समाधानकारक झाला, पिकेही चांगली आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे जास्त काळ पाणी शेतात साचून राहिल्याने करप्याचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे पीक बाधित झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने चांगला परतावा मिळण्याची आशा मावळली आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com